शिवसेना, धनुष्यबाण निर्णयानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काळाराम मंदिरात महाआरती

नाशिक (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिल्या नंतर नाशिक मधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी काळाराम मंदिरात जाऊन महाआरती केली. नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काळाराम मंदिरात आरती केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राजू लवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आमच्या गटाला नाव आणि चिन्ह मिळाले असून त्याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात श्री रामाप्रमाणे धनुष्याचा उपयोग लोकांच्या, जनतेच्या हितासाठी केला जाईल असे त्यांनी सांगितले. तर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्रांचे जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला मिळाले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार सोडून काही लोक काम करत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय झाला तो सर्व शिवसैनिकांना अभिप्रेतच होता. या निर्णयामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खुश आहेत. तसेच काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांना अशी विंनती केली की, बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पक्षाला व कार्यकर्त्यांना आशीर्वाद लाभो असे त्यांनी सांगितले.


Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,