अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक-सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत १८ वर्षांपर्यंतच्या सुमारे ४ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील सदर मोहिम राबवित आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बालकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणेसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिम हाती घेण्यात आली आहे. सदरील मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी २५७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातीला ३० वैद्यकीय अधिकारी, १६१ समुदाय आरोग्य अधिकारी, ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणि शाळांना भेटी देऊन आरोग्य तपासणी करतील. यामुळे विद्यार्थी आणि मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. परिणामी चांगल्या आरोग्याचा फायदा त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी होईल. रायगड जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात १८ वर्षांपर्यंतच्या मुले आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत पालकांचेही प्रबोधन करून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्ह्यातील एकूण २ हजार ५२८ शासकीय, ३८५ निमशासकीय आणि २४६ खासगी शाळांमधील ३ लाख २१ हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ३ हजार ५९ अंगणवाड्या आणि ७२ खासगी नर्सरीमधील १ लाख ४० हजार बालकांची तापसणी होईल. आशाप्रकारे आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यातील एकंदर ४ लाख ६१ हजार बालके व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…