महाविकास आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात, उदय सामंतांचा दावा

सोलापूर : येत्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला खिंडार पडण्याचे चित्र आहे. उद्योगमंत्री उदय सामंत महाविकास आघाडीतील तब्बल २० ते २२ आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यापुढे येणारं महापालिका, लोकसभा अथवा विधानसभेचे मैदान असो, सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.


आघाडीमधील १० ते १२ आमदार आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत. तर ८ ते १० आमदार माझ्या संपर्कात असल्याचं उद्य सामंत यांनी सांगितलं आहे. तसेच, राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले.


टेंभुर्णीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक