महाविकास आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात, उदय सामंतांचा दावा

सोलापूर : येत्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला खिंडार पडण्याचे चित्र आहे. उद्योगमंत्री उदय सामंत महाविकास आघाडीतील तब्बल २० ते २२ आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यापुढे येणारं महापालिका, लोकसभा अथवा विधानसभेचे मैदान असो, सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.


आघाडीमधील १० ते १२ आमदार आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत. तर ८ ते १० आमदार माझ्या संपर्कात असल्याचं उद्य सामंत यांनी सांगितलं आहे. तसेच, राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले.


टेंभुर्णीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत