कल्याण रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला ७ लाखांचा मुद्देमाल

कल्याण : लांब पल्ल्याच्या गाडीत झोपेत असलेल्या प्रवाश्यांच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून त्याच्या कडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश आले आहे.


गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ३० जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर - कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणारी एक महिला प्रवासी झोपेत असतांना पहाटे २ ते ४ दरम्यान एका अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्याजवळील लेडीज पर्स लंपास केली होती. या गुन्ह्याची नोंद डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याच गुन्ह्याचा तपास करत असतांना संशयीत आरोपी वसई रेल्वे पोलिस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून आला.


या आधारे शोध घेत असतांना पालघर येथे राहणाऱ्या सुभान अहमद जहरी अहमद (वय-४१वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता या आरोपीच्या नावे अशाच प्रकारचे आणखी ३ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहीती मिळाली. या चारही गुन्ह्यात आरोपीने लंपास केलेला सात लाख २९ हजार ४९८ इतक्या रकमेचा मुद्देमात हस्तगत करण्यात आला आहे यात ४ मोबाईल तसेच दागिन्यांचा समावेश आहे.


हे गुन्हे उघड करण्यात पोलिस आयुक्त (लोहमार्ग-मुंबई ) डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ सहाय्यक आयुक्त (गुन्हे)सचिन कदम, वरीष्ठ पोलिस निरिक्षक(गुन्हे) अरशुद्दीन शेख यांचे मार्गदर्शनासह पोलिस अंमलदार राजेंद्र दिवटे, महेंद्र कर्डिले, रविन्द्र ठाकूर, अजित माने, अक्षय चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका