कल्याण रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला ७ लाखांचा मुद्देमाल

कल्याण : लांब पल्ल्याच्या गाडीत झोपेत असलेल्या प्रवाश्यांच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून त्याच्या कडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश आले आहे.


गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ३० जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर - कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणारी एक महिला प्रवासी झोपेत असतांना पहाटे २ ते ४ दरम्यान एका अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्याजवळील लेडीज पर्स लंपास केली होती. या गुन्ह्याची नोंद डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याच गुन्ह्याचा तपास करत असतांना संशयीत आरोपी वसई रेल्वे पोलिस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून आला.


या आधारे शोध घेत असतांना पालघर येथे राहणाऱ्या सुभान अहमद जहरी अहमद (वय-४१वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता या आरोपीच्या नावे अशाच प्रकारचे आणखी ३ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहीती मिळाली. या चारही गुन्ह्यात आरोपीने लंपास केलेला सात लाख २९ हजार ४९८ इतक्या रकमेचा मुद्देमात हस्तगत करण्यात आला आहे यात ४ मोबाईल तसेच दागिन्यांचा समावेश आहे.


हे गुन्हे उघड करण्यात पोलिस आयुक्त (लोहमार्ग-मुंबई ) डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ सहाय्यक आयुक्त (गुन्हे)सचिन कदम, वरीष्ठ पोलिस निरिक्षक(गुन्हे) अरशुद्दीन शेख यांचे मार्गदर्शनासह पोलिस अंमलदार राजेंद्र दिवटे, महेंद्र कर्डिले, रविन्द्र ठाकूर, अजित माने, अक्षय चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.

Comments
Add Comment

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने २५ व्या

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर