भिवंडीत गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व स्वागत

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात तथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची धम्मपद यात्रा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने पडघा टोलनाक्या जवळील मुंबई-नाशिक हायवे जवळील गोपाळास हॉटेल येथे होणार आहे.


यावेळी पडघा विभागातील नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करता येईल. यावेळी थायलंड येथील ११० बौध्द भिक्खू संघ, धम्मपद यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. थायलंड येथील बौध्द भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित नागरिकांना धम्मदेसना मिळणार आहे. पडघा व भिवंडी परिसरातील नागरिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.