आझाद मैदानात राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, राज्यपालांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.


मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव २०१९ मध्ये मध्य प्रदेशात, २०२२ मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि आता महाराष्ट्रात याचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी असतील. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


या ९ दिवसांच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातील सुमारे ३५० लोककलाकार आणि आदिवासी कलाकारांसह सुमारे ३०० स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग कलाकार, प्रसिद्ध शास्त्रीय कलाकार तसेच प्रसिद्ध स्टार कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.