वाढदिवसाच्या निमित्ताने अण्णा हजारेंचा एकनाथ शिंदेंना फोन, केले सरकारच्या कामाचे कौतुक

राळेगणसिद्धी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेत्यांनी व सर्व स्तरांतून देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.


'तुमच्या कामाच्या बातम्या वाचतो, चांगले काम करत आहात. असेच काम पुढे सुरू ठेवा. आमचा आशिर्वाद चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे कायम आहे, असे कौतुक अण्णा हजारे यांनी केले.


'तळागाळातून परिवर्तन होणे गरजेचे होते. तुमची जोडी चांगली काम करते. ही जोडी महाराष्ट्राला चांगली मिळाली आहे. तुमचा महाराष्ट्रासाठी एक-एक क्षण महत्वाचा आहे. तो क्षण तुम्ही राज्याच्या समाजकारणासाठी लावा, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या