नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये मृतांचा ११ हजार २०० हून अधिक झाला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये एक भारतीय अडकल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार बेंगळुरू मधील एक व्यापारी तुर्कीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही सांगितले की ८५० लोक इस्तंबूलच्या आसपास आहेत, २५० अंकारामध्ये आहेत आणि उर्वरित देशभरात पसरलेले आहेत. दरम्यान १० भारतीय नागरिक तुर्कीच्या दुर्गम भागात अडकले असून ते सुरक्षित आहेत.
सोमवारी पहाटे झालेल्या भीषण भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये त्यापैकी एकट्या तुर्कीमध्ये ८ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास ५० हजारहून अधिक लोक जखमी झाले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बेपत्ता भारतीय बेंगळुरूमधील कंपनीत काम करत होता आणि तुर्कस्तानच्या व्यावसायिक दौऱ्यावर होता. सरकार त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.
दरम्यान, तेथील बचावकर्ते ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या भीषण भूकंपानंतर भारताने पाठवलेली साहित्य आणि बचावकार्याची मदत तेथे पोहोचली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…