'वंदे भारत'सोबत मोदी १० तारखेला 'या' प्रकल्पांचे उद्घाटन करणार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी मुंबईत दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. सेमी-हायस्पीड स्पेशल गाड्यांबरोबरच, ते त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) एक्स्टेंशन ब्रिज आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन करणार आहेत.


दोन्ही रस्त्यांचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. रेल्वे अधिकारी आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी मंगळवारी या प्रकल्पाच्या तपशीलांवर चर्चा करण्यासाठी आणि लॉन्चिंगची योजना आखण्यासाठी बैठक घेतली. सर्व काही योजनेनुसार पार पडल्यास, पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून पुलाचे आणि अंडरपासचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील.



सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज


३.८ किमी-लांब सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज कपाडिया जंक्शनजवळून सुरू होतो आणि वाकोला जंक्शनजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वर संपतो. एमएमआरडीएने सांगितले की, सुरुवातीला पुलाचा काही भाग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. संपूर्ण विस्तारित पूल सुमारे ४१५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. २०१७ मध्ये या पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि जवळपास पाच वर्षानंतरही हा पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला होणार आहे.



कुरार अंडरपास


विकास प्राधिकरणाने कुरार ग्राम पादचारी व वाहन सबवेचे रुंदीकरण आणि बांधकाम पूर्ण केले आहे. अंदाजे २५ कोटी रुपये खर्चून हा अंडरपास तयार झाला आहे. तो कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा