'वंदे भारत'सोबत मोदी १० तारखेला 'या' प्रकल्पांचे उद्घाटन करणार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी मुंबईत दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. सेमी-हायस्पीड स्पेशल गाड्यांबरोबरच, ते त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) एक्स्टेंशन ब्रिज आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन करणार आहेत.


दोन्ही रस्त्यांचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. रेल्वे अधिकारी आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी मंगळवारी या प्रकल्पाच्या तपशीलांवर चर्चा करण्यासाठी आणि लॉन्चिंगची योजना आखण्यासाठी बैठक घेतली. सर्व काही योजनेनुसार पार पडल्यास, पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून पुलाचे आणि अंडरपासचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील.



सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज


३.८ किमी-लांब सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज कपाडिया जंक्शनजवळून सुरू होतो आणि वाकोला जंक्शनजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वर संपतो. एमएमआरडीएने सांगितले की, सुरुवातीला पुलाचा काही भाग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. संपूर्ण विस्तारित पूल सुमारे ४१५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. २०१७ मध्ये या पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि जवळपास पाच वर्षानंतरही हा पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला होणार आहे.



कुरार अंडरपास


विकास प्राधिकरणाने कुरार ग्राम पादचारी व वाहन सबवेचे रुंदीकरण आणि बांधकाम पूर्ण केले आहे. अंदाजे २५ कोटी रुपये खर्चून हा अंडरपास तयार झाला आहे. तो कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले