मुंबईकरांसाठी आता जादा पाणी मिळणार…

Share

मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून सध्या असलेले पाण्याचे स्तोत्र कमी पडत आहेत. मुंबईकरांची वाढती पाण्याची तहान भागवण्यासाठी आता महापालिकेच्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच विहार तलावातील वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी सद्य स्थितीत मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मात्र मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता भविष्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. वेळेवर पाऊस न आल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी कमी होत जातो आणि मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागते. २०२२ मध्ये ही अशीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली होती. त्यामुळे मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका नव्या उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पासाठी विहार सरोवर येथे पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडूप जल शुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाईल. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून खर्चही वाढणार आहे. यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीनंतर किती पाण्यावर प्रक्रिया केली जाणार? हे निश्चित होणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले .

Recent Posts

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

16 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

17 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

17 hours ago

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

17 hours ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

18 hours ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

19 hours ago