बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्षांची दुरवस्था

  306

वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सध्या गायब झालेले दिसून येत आहेत. तर ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष असल्याचे दिसून येतात त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे.


दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्रच चांगली अंमलबजावणी झाली. ही सुविधा चार ते पाच वर्षे सुस्थितीत सुरू राहिली. त्यानंतर अनेक ठिकाणी पंखा, खिडक्यांना पडदे, तर काही ठिकाणी मातांना बसण्यासाठी खुर्चीच्या सुविधा हळूहळू गायब होत गेल्या. अलीकडेच हे कक्षच गायब झाले. डहाणू येथे असलेला हिरकणी कक्ष बस स्थानकात नसल्याने तो शोधून काढणे मातांसाठी कठीण जात आहे.


जव्हार बस स्थानकात हिरकणी कक्ष आहे मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. बोईसर बस स्थानकात आजवर हिरकणी कक्ष उभारला गेलेला नाही. या ठिकाणी बस स्थानकाची पक्की इमारत नसल्याने हिरकणी कक्ष ठेवला गेलेला नसल्याचे समजते. वाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष गायब होऊन चार वर्षे झाली आहेत. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी हिरकणी कक्षाची नितांत आवश्यकता आहे. मात्र बस स्थानकात जागा अपुरी असल्याने हिरकणी कक्ष कुठे करायचा, हा प्रश्न येथील प्रशासनाला पडला आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक

बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली