खेळणे कमी झाल्याने मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुलांचा खेळण्याचा वेळ कमी झाला असून टॅब, मोबाईलवर व्यस्त राहिल्याने किंवा सतत टीव्ही पाहिल्याने लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे दिसून येत आहेत. अलिकडील झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडीओ गेम, टॅब किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी संबंधित लक्षणे आढळतात. पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम कमी करतात तेव्हा ही लक्षणे दूर होतात.


हा सिंड्रोम ‘व्हर्च्युअल ऑटिझम’ म्हणून ओळखला जातो किंवा ऑटिझम संगणकाच्या स्क्रीननद्वारे होतो. रोमानियातील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. मारियस झाम्फिर यांनी ‘व्हर्च्युअल ऑटिझम’ या संज्ञेचा शोध लावला. व्हर्च्युअल ऑटिझमचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक ठरते; परंतु मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी मुलाची ऑटिस्टिक लक्षणे तपासून ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा आभासी ऑटिझम दिसून येतेय किंवा कसे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतात ऑटिझमचे प्रमाण वाढत असून यामुळे पालक, शाळा आणि आरोग्यसेवा व्यावसायिकही चिंताग्रस्त झाले आहेत.


पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा हल्लीच्या पिढीतील मुलांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जास्त रस दिसून येतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार वाढलेला स्क्रीन टाईम हा मेलेनोप्सिन-संप्रेषण करणारे न्यूरॉन्स आणि कमी झालेल्या गॅमा-अमिनोब्युटीरिक अॅसिड न्यूरोट्रान्समीटरशी संबंधित आहे. त्यामुळे असामान्य वर्तन, मानसिक आणि भाषिक विकास कमी होतो आणि इतर समस्या जाणवतात. दररोज चार किंवा त्याहून अधिक तास गॅजेट्सचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. आभासी जगात जास्त वेळ घालवल्याने लहान मुलांच्या मेंदूवर दुष्परिणाम होतो. यामुळे बोलण्यात तोतरेपणा येऊ शकतो तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात, असे समोर आले आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या