प्रदर्शनाआधीच खूपच वादग्रस्त ठरलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात ‘पठाण’ फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखने ‘पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस होऊन गेले आहेत. सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी १ फेब्रुवारी रोजी १८ कोटींची कमाई केली होती. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करून पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली. लवकरच हा चित्रपट ३५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे.
रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ‘पठाण’ने ५५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ६८ कोटी, तिसऱ्या दिवशी ३८ कोटी, चौथ्या दिवशी ५१.५० कोटी आणि पाचव्या दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच, सहाव्या दिवशी या चित्रपटाने भारतामध्ये २५ कोटींचे कलेक्शन केले. मंगळवारी ३१ जानेवारीला या चित्रपटाने २३ कोटींचे कलेक्शन केले.
‘पठाण’ चित्रपट हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण हा चित्रपट बाहुबली-२ हिंदी (१० दिवस), ‘केजीएफ २’ हिंदी (११ दिवस), दंगल (१३ दिवस), संजू (१६ दिवस), टायगर जिंदा है (१६ दिवस), पिके (१७ दिवस) वॉर (१९), बजरंगी भाईजान (२० दिवस), सुल्तान (३५ दिवस) या चित्रपटांना मागे टाकत सर्वात कमी दिवसांत ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खानने देखील कॅमिओ केला आहे.
-दीपक परब
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…