कसबा पोटनिवडणूक: महाविकास आघाडीत फूट? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले शिवसेनेनेच...

मुंबई: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.


मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष असलेले हेमंत रासने हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०१४ मध्ये कसबा पेठ जागा काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र ज्यावेळी सेनेनी ही जागा लढवली होती. त्यावेळी सेनेला ६५ हजार मतं मिळाली होतीय त्यामुळे सेनेला आम्ही विनंती केली आहे की, तुम्ही दोन्हीही जागा लढा. कारण कसब्याची जागा काँग्रेस कायम हरत आली आहे. मात्र तिथे सेनेचा बोलबाला आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची नाही. त्यामुळे आम्ही सेनेला दोन्ही जागा लढण्याची विनंती केली आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहूयात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन ठरवू, असं म्हटलं जात असतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सहयोगी पक्ष वंचितकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिवसेनेला फूस लावत असल्याचं म्हटलं जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील