कसबा पोटनिवडणूक: महाविकास आघाडीत फूट? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले शिवसेनेनेच...

मुंबई: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.


मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष असलेले हेमंत रासने हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०१४ मध्ये कसबा पेठ जागा काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र ज्यावेळी सेनेनी ही जागा लढवली होती. त्यावेळी सेनेला ६५ हजार मतं मिळाली होतीय त्यामुळे सेनेला आम्ही विनंती केली आहे की, तुम्ही दोन्हीही जागा लढा. कारण कसब्याची जागा काँग्रेस कायम हरत आली आहे. मात्र तिथे सेनेचा बोलबाला आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची नाही. त्यामुळे आम्ही सेनेला दोन्ही जागा लढण्याची विनंती केली आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहूयात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन ठरवू, असं म्हटलं जात असतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सहयोगी पक्ष वंचितकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिवसेनेला फूस लावत असल्याचं म्हटलं जात आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या