अदानी कंपनीसाठी खुशखबर! जागतिक रेटिंग एजन्सीने सांगितले...

मुंबई: जगातील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी फिचने शुक्रवारी अदानी समुहाबाबत एक खुशखबर दिली आहे. फिचच्या म्हणण्यानूसार हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाच्या रेटिंगवर कोणताही तात्काळ परिणाम होणार नसल्याचे फिचचे म्हणणे आहे.


फीचने असेही नमुद केले की, अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समूहाच्या क्रेडिट प्रोफाइलवर कोणताही परिणाम झाला नाही. अदानी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेतला होता. त्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवाल निराधार असल्याचे अदानी समुहाने म्हटले होते आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचीही पुष्टी केली होती.


दुसरीकडे, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनेही शुक्रवारी सांगितले की ते अदानी समूहाच्या आर्थिक अस्थिरतेवर लक्ष ठेवून आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीबाबत ते म्हणाले, अलीकडच्या घडामोडींचा समूहावर नकारात्मक परिणाम होत आहे आणि त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांत समूहाच्या कर्ज उभारणीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील