'पुनःधैर्य' योजनेला महिलांचा प्रतिसाद

भाईंदर : मीरा- भाईंदर शहरात गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या 'पुनः धैर्य 'योजने मार्फत ५० पेक्षा अधिक महिला अर्जदारांचे समाधान करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मागच्या वर्षभरातील महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस आयुक्तालयाकडून आता महिलांसाठी दर शनिवारी 'पुनःधैर्य ' योजना राबवण्यात येत आहे. आयुक्तलायकडून मीरा-भाईंदर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.


महिलांवर होणारे अत्याचार तसेच इतर प्रकरणा बाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येते. त्यानंतर याप्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये महिला तक्रारदार व समोरच्या व्यक्तीमध्ये तडजोड करुन पोलिसांकडून प्रकरण निकाली काढण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये काही दिवसानंतर तक्रारदार महिलेला पुन्हा त्रास दिला जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहरातील काशिमिरा, मीरा रोड, भाईंदर, नवघर, उत्तन, नयानगर असशी ६ पोलिस स्थानकांत ही योजना सुरु करण्यात आली आहे.


पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची योजना राबवली जात आहे. महिलांशी संबंधित घडणारे गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास