प्रवासादरम्यान विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

  73

मुंबई: विमान प्रवासा दरम्यान आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून नागपूर येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) विमानात तो प्रवास करत होता.


नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे हे विमान मुंबईकडे २४ जानेवारी सकाळी ११.०५ वाजता रवाना झाले हे विमान मुंबई विमानतळावर १२.३० च्या सुमारास उतरत असतानाच विमानाचे आपात्कालीन दरवाजे कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देश वैमानिकास मिळाले. या माहितीच्या आधारे लगेचच विमानातील सहकर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडण्यात आल्याचे लक्षात आले.


https://twitter.com/ANI/status/1619590308211339265?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1619590311604555777%7Ctwgr%5Ef50fe0c25ba876a0d3d61700466b95401d21eafa%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fvidarbha%2F447875%2Fnagpur-attempt-to-open-emergency-door-of-indigo-flight%2Far

त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि ३३६ तसेच एअरक्राफ्ट कायदा १९३७ अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना विमान उतरण्यापुर्वी लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर या प्रवाशाविरुद्ध तक्रार देण्यात आली. वैमानिक, सहवैमानिक आणि सह प्रवाशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित प्रणव राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक