प्रवासादरम्यान विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

  80

मुंबई: विमान प्रवासा दरम्यान आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून नागपूर येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) विमानात तो प्रवास करत होता.


नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे हे विमान मुंबईकडे २४ जानेवारी सकाळी ११.०५ वाजता रवाना झाले हे विमान मुंबई विमानतळावर १२.३० च्या सुमारास उतरत असतानाच विमानाचे आपात्कालीन दरवाजे कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देश वैमानिकास मिळाले. या माहितीच्या आधारे लगेचच विमानातील सहकर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडण्यात आल्याचे लक्षात आले.


https://twitter.com/ANI/status/1619590308211339265?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1619590311604555777%7Ctwgr%5Ef50fe0c25ba876a0d3d61700466b95401d21eafa%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fvidarbha%2F447875%2Fnagpur-attempt-to-open-emergency-door-of-indigo-flight%2Far

त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि ३३६ तसेच एअरक्राफ्ट कायदा १९३७ अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना विमान उतरण्यापुर्वी लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर या प्रवाशाविरुद्ध तक्रार देण्यात आली. वैमानिक, सहवैमानिक आणि सह प्रवाशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित प्रणव राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी