मेट्रो 2A, 7 सुस्साट, आठवड्याभरातच १० लाख प्रवासी

मुंबई: पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकर्पण केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोने अवघ्या आठड्याभरात तब्बल १० लाख लोकांनी प्रवास केला आहे. तर गेल्यावर्षी सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोने १० महिन्यांत १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मेट्रो 2A आणि ७ चे १९ जानेवारी रोजी लोकार्पण केले होते. त्यानंतर २० जानेवारीला सुरु झालेल्या या मेट्रोने आतापर्यंत तब्बल १० लाख प्रवाशांनी आहे. मेट्रो लाईन 2A डीएन नगर अंधेरी ते दहिसरपर्यंत धावते. तर, लाईन ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वपर्यंत धावते. या दोन्ही मेट्रो लाईन एकत्रितपणे, साधारण ३५ किमीचा पल्ला पार करतात. यामध्ये साधारण एकूण ३० एलिव्हेटेड स्टेशनचा समावेश आहे.


गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. आरे ते डहाणूकरवाडी दरम्यान हा पहिला टप्पा करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत १० लाख प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.


या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो 1 च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना या मेट्रोचा फायदा झाला आहे.



‘मुंबई वन कार्ड’ द्वारे 'या' सुविधा


मेट्रो 2A आणि 7 च्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन कार्ड’ लाँच करण्यात आले. मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी हे कार्ड वापरून देशाच्या कोणत्याही भागात मेट्रोचा लाभ घेऊ शकतात. या कार्डाचा वापर मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे खरेदी करण्यासाठीही केला जाऊ शकतो. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. यात १०० ते १ हजार रुपयांचे रिचार्ज करता येते. हे कार्ड ट्रेनमध्ये तसेच बसमध्ये वापरता येते. एवढेच नाही तर मुंबईकर शॉपिंगसाठीही मुंबई वन कार्डचा वापर करू शकतात.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ