गहू ४ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा


नवी दिल्ली : केंद्र सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती ४ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.


बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली आहे. हा गहू भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) मार्फत पुढील २ महिन्यांत विविध माध्यमांतून विकला जाईल. याचबरोबर, हे गव्हाचे पीठ गिरणी मालकांना ई-लिलावाद्वारे विकले जाणार आहे. तसेच, गहू दळून पीठ बनवतील आणि ते कमाल किरकोळ किमतीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, सहकारी संस्था आणि इतर संस्थांना २३.५० रुपये प्रति किलो दराने गहू विकणार आहे.


दरम्यान, एकदा नवीन गव्हाचे पीक बाजारात येण्यास सुरुवात झाली की, उत्पादन चांगले असल्यास, मध्य प्रदेश वगळता सर्व उत्पादक राज्यांमध्ये किंमती किमान आधारभूत किमतीच्या खाली येऊ शकतात, असे अन्य लोकांचे म्हणणे आहे. तर देशातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी गव्हाची सरासरी किंमत ३३.४३ रुपये प्रति किलो होती, तर गेल्या वर्षी याच काळात ही किंमत २८.२४ रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी, यावर्षी गव्हाच्या पिठाचा सरासरी भाव ३७.९५ रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला असून गेल्या वर्षी हा दर ३१.४१ रुपये प्रतिकिलो होता.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स