गहू ४ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा


नवी दिल्ली : केंद्र सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती ४ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.


बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली आहे. हा गहू भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) मार्फत पुढील २ महिन्यांत विविध माध्यमांतून विकला जाईल. याचबरोबर, हे गव्हाचे पीठ गिरणी मालकांना ई-लिलावाद्वारे विकले जाणार आहे. तसेच, गहू दळून पीठ बनवतील आणि ते कमाल किरकोळ किमतीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, सहकारी संस्था आणि इतर संस्थांना २३.५० रुपये प्रति किलो दराने गहू विकणार आहे.


दरम्यान, एकदा नवीन गव्हाचे पीक बाजारात येण्यास सुरुवात झाली की, उत्पादन चांगले असल्यास, मध्य प्रदेश वगळता सर्व उत्पादक राज्यांमध्ये किंमती किमान आधारभूत किमतीच्या खाली येऊ शकतात, असे अन्य लोकांचे म्हणणे आहे. तर देशातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी गव्हाची सरासरी किंमत ३३.४३ रुपये प्रति किलो होती, तर गेल्या वर्षी याच काळात ही किंमत २८.२४ रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी, यावर्षी गव्हाच्या पिठाचा सरासरी भाव ३७.९५ रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला असून गेल्या वर्षी हा दर ३१.४१ रुपये प्रतिकिलो होता.

Comments
Add Comment

Google Maps new features : हँड्स-फ्री ड्रायव्हिंग! जेमिनी AI सह गुगल मॅप्समध्ये १० नवीन फीचर्स; काय आहे खास? जाणून घ्या

नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी, गुगलने मॅप्समध्ये जेमिनी AI सह तब्बल १० नवीन

वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी