भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरात २६ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. दीड महिन्यानंतर चिमुरडा आई वडिलांच्या समोर आल्याने आईवडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. विक्री करण्यासाठी चिमुरड्याची चोरी करणाऱ्या एका व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित गणेश नरसय्या मेमुल्ला याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूलचोरी करून विक्री केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस पथकाने पद्मानगर नवजीवन कॉलनी या परिसरात राहणाऱ्या भारती सुशील शाहू व आशा संतोष शाहू या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. या तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…