समुपदेशनाच्या माध्यमातून जोडले ६८४ जणांचे संसार

  87

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेल मार्फत २०२२ या वर्षात समुपदेशन करून ६८४ जणांचे संसार जोडण्यात यश प्राप्त झाले असल्याची माहिती भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी दिली आहे.


महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे. त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयाच्या वतीने भरोसा सेलची गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरात या सेलकडे १ हजार १२१ तक्रारी अर्ज प्राप्त झाले.


समुपदेशन करण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ति देखील कोणत्याही प्रकारची फी न घेता पोलिसांना मदत करत आहेत. यात ३ वकील, २ डॉक्टर आणि काही समाजसेवी संस्थांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात गणेश पाटील विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन

आधुनिक मत्स्यपालनावर विशेष कार्यशाळा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम

जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निघणार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली लोकसंख्येची माहिती पालघर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे