सानिया-रोहन जोडीची अंतिम फेरीत धडक

Share

कॅनबेरा (वृत्तसंस्था) : उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रीटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव करत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडगोळीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया – रोहन जोडीने नील – देसीरा जोडगोळीचा ७-६, ६-७, १०-६ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात आक्रमक सुरुवात केली. या जोडीने पहिला सेट ७-६ असा नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीने दणक्यात पुनरागमन केले. रोमांचक झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये सानिया आणि रोहन यांना ६-७ च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दुसरा सेट गमावल्यानंतर भारताच्या जोडीने जोरदार पलटवार केला. अखेरच्या सेटमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी नील स्कूप्स्की आणि देसीरा क्रॉज्जिक या जोडीला संधी दिली नाही. भारताच्या जोडीने १०-६ च्या फरकाने तिसरा सेट एकतर्फी जिंकला. या विजयासह सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago