ऋषभ पंत आयसीसीच्या कसोटी संघात

  103

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने २०२२चा सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी संघ मंगळवारी जाहीर केला. या संघात भारताचा एकमेव खेळाडू ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे.


आयसीसीने पुरुषांचा ‘कसोटी टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही स्थान मिळाले आहे.


आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघावर नजर टाकली, तर त्यात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन इंग्लिश क्रिकेटपटू संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. याशिवाय भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एका खेळाडूची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.


उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), क्रेग ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज), मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया), बाबर आझम (पाकिस्तान), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), ऋषभ पंत (भारत), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड) असा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंड विजयापासून ३५ धावा दूर तर भारताला हव्यात ४ विकेट

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र