मुंबई विद्यापीठाच्या 'या' परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून ३० जानेवारीला होणाऱ्या तब्बल ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा पुढे ढकलून ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत. यामध्ये लॉ, अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संदर्भातील माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.


राज्यात महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र या सर्व परीक्षा आता ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.


विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखांची नोंद घ्यावी असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.


दरम्यान, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला