नाशिकमध्ये 'या' पाच शाळा अनधिकृत

नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाने बोगस शाळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईनंतर नाशिक महापालिका क्षेत्रात कोणत्याही मंडळाची मान्यता नसलेल्या ५ शाळा या समोर आल्या असून १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.


दरम्यान ८ दिवसांत मान्यता नसलेल्या शाळा बंद केल्या नाहीत तर अशा शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. सुनीता धनगर यांनी सांगितले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मान्यता नसलेल्या शाळांविरोधात कारवाई कराला सुरुवात केल्यानंतर राज्यात सर्वच शिक्षण विभागाला याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार घेतलेल्या माहितीमध्ये सीबीएससीची मान्यता नसलेल्या ५ शाळा निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड येथील बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल, नाशिकरोड येथील एमराल्ड हाइट्स, पंचवटीतील विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, एक्सेल पब्लिक स्कूल, औरंगाबाद रोडवरील गोल्डन डेज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना ८ दिवसात शाळा बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे, नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासन अिधकारी डॉ. सुनीता धनगर यांनी दिली.


तसेच शहरामध्ये १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची अधिकृत मान्यताच नाही आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी