नाशिकमध्ये 'या' पाच शाळा अनधिकृत

नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाने बोगस शाळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईनंतर नाशिक महापालिका क्षेत्रात कोणत्याही मंडळाची मान्यता नसलेल्या ५ शाळा या समोर आल्या असून १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.


दरम्यान ८ दिवसांत मान्यता नसलेल्या शाळा बंद केल्या नाहीत तर अशा शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. सुनीता धनगर यांनी सांगितले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मान्यता नसलेल्या शाळांविरोधात कारवाई कराला सुरुवात केल्यानंतर राज्यात सर्वच शिक्षण विभागाला याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार घेतलेल्या माहितीमध्ये सीबीएससीची मान्यता नसलेल्या ५ शाळा निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड येथील बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल, नाशिकरोड येथील एमराल्ड हाइट्स, पंचवटीतील विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, एक्सेल पब्लिक स्कूल, औरंगाबाद रोडवरील गोल्डन डेज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना ८ दिवसात शाळा बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे, नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासन अिधकारी डॉ. सुनीता धनगर यांनी दिली.


तसेच शहरामध्ये १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची अधिकृत मान्यताच नाही आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा