नाशिकमध्ये ‘या’ पाच शाळा अनधिकृत

Share

नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाने बोगस शाळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईनंतर नाशिक महापालिका क्षेत्रात कोणत्याही मंडळाची मान्यता नसलेल्या ५ शाळा या समोर आल्या असून १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान ८ दिवसांत मान्यता नसलेल्या शाळा बंद केल्या नाहीत तर अशा शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. सुनीता धनगर यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मान्यता नसलेल्या शाळांविरोधात कारवाई कराला सुरुवात केल्यानंतर राज्यात सर्वच शिक्षण विभागाला याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार घेतलेल्या माहितीमध्ये सीबीएससीची मान्यता नसलेल्या ५ शाळा निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड येथील बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल, नाशिकरोड येथील एमराल्ड हाइट्स, पंचवटीतील विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, एक्सेल पब्लिक स्कूल, औरंगाबाद रोडवरील गोल्डन डेज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना ८ दिवसात शाळा बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे, नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासन अिधकारी डॉ. सुनीता धनगर यांनी दिली.

तसेच शहरामध्ये १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची अधिकृत मान्यताच नाही आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago