पंतप्रधान मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन

  77

जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!


गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.


या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसंच पार्थिवासोबत शववाहिनीतून स्मशानभूमीपर्यंत प्रवासही केला.



गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. देशभरातून विविध नेत्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.


आई हिराबेन यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात पोहोचले. या ठिकाणाहून ते पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सहभागी झाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ७ हजार ८०० कोटीच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.


Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या