निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे


नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक - २०२४ मध्ये (ईपीआय) महाराष्ट्राने तामिळनाडूला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. देशातील पाच राज्यांत गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा अनुक्रमे तीन, चार आणि पाचवा क्रमांक लागतो.


केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या यादीनुसार, महाराष्ट्राने तामिळनाडूकडून पहिले स्थान संपादन केले आहे. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत केलेल्या कामगिरीवरून ही यादी तयार करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये तामिळनाडूचा पहिला क्रमांक होता. खालोखाल महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणाचा क्रमांक लागत होता. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ईपीआय २०२४’ची क्रमवारी ‘ईपीआय २०२२’शी तुलना करण्यायोग्य नाही. कारण, राज्यांचे मूल्यांकन करण्याची संपूर्ण कार्यपद्धती बदलली आहे. लहान राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीत, उत्तराखंडने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर, नागालँड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा यांचा क्रमांक लागतो. निर्यात हे विकासाच्या प्रमुख चालकांपैकी एक आहे. भारताला ३० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी निर्यातीचा वाटा ७.५ लाख कोटी डॉलरवर न्यावा लागेल. त्यात ज्या राज्यांची निर्यात सज्जता आहे. ज्या राज्यांची तशी क्षमता आहे, त्यांची या यादीत निवड करण्यात आल्याचे ते म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने राबविलेल्या विविध धोरणांमुळे निर्यातीत पहिला क्रमांक पटकावण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. ऑटोमोबाईल्स, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्माण, रसायने, कापड आणि आयटी सेवा यासारख्या क्षेत्रांत राज्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. तसेच, मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यासारख्या प्रमुख बंदरांच्या उपस्थितीने निर्यात वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निर्यातदारांसाठी एकल-खिडकी प्रणाली, लॉजिस्टिक्स सुधारणा, औद्योगिक क्लस्टर्सचा विकास आणि जिल्हा-विशिष्ट उत्पादन ओळख, यासारख्या उपक्रमांमुळे राज्याची निर्यात तयारी बळकट झाल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय