जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून प्रवाशांमध्ये या गाडीबाबत उत्सुकता वाढली आहे. आधुनिक सुविधा, वेगवान प्रवास आणि आरामदायी डबे ही या ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र प्रवासाचे नियोजन करताना तिकीट रद्द करायचे झाल्यास नेमका किती आर्थिक फटका बसणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्दीकरण आणि परताव्याचे नियम स्पष्ट केले आहेत.


रेल्वेच्या नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास परतावा प्रवासाच्या वेळेवर अवलंबून असणार आहे. जर प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या किमान ७२ तास आधी तिकीट रद्द केले, तर तिकीट रकमेपैकी २५ टक्के शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत दिली जाईल.


प्रवासाच्या वेळेच्या अधिक जवळ तिकीट रद्द केल्यास कपात वाढते. ट्रेन सुटण्याच्या ८ तास ते ७२ तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास तिकीट रकमेपैकी ५० टक्के रक्कम कापली जाईल आणि उरलेली रक्कम प्रवाशाला परत मिळेल.


मात्र ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द न केल्यास किंवा त्यानंतर रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय वेळेत घेणे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा–कामाख्या मार्गावर देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला असून ही सेवा प्रिमियम रात्रीच्या प्रवासासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आधुनिक रेल्वेचा अनुभव घ्यायचा असल्यास तिकीट बुकिंगसोबतच रद्दीकरणाचे नियम लक्षात ठेवणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरेल.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी