मुकेश अंबानी आता चॉकलेट विकणार!

मुंबई : देशातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती आणखी एक कंपनी येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एफएमजीसी युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड लोटस चॉकलेटमध्ये मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट्सच्या प्रवर्तकांसह एक करार केला आहे. कंपनी चॉकलेट, कोको उत्पादने आणि कोको डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते. शेअर खरेदी करारांतर्गत, रिलायन्स कंझ्युमरने लोटस चॉकलेटच्या पेड-अप शेअर कॅपिटलपैकी ७७ टक्के हिस्सा संपादन केला आहे.


कंपनीचे प्रवर्तक प्रकाश पेराजे पै आणि अनंत पेराजे पै यांच्याकडून शेअर बाजारात खरेदी केली जाणार आहे. यानंतर, रिलायन्स कंपनीतील २६ टक्के स्टेक घेण्यासाठी खुली ऑफर देईल. रिलायन्स या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा ७४ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. ही खरेदी ११३ रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली आहे. रिलायन्स कंझ्युमर ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकत्रित निव्वळ नफा ३६ टक्क्यांनी वाढून २,३०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने अलीकडेच आपला ब्रँड इंडिपेंडन्स लाँच केला आहे. सध्या ते गुजरातमधील अहमदाबाद येथे लाँच करण्यात आले आहे. नंतर ते देशभर सुरू करण्याची योजना आहे. रिलायन्स रिटेलच्या प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी या आहेत. खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांसह इतर परवडणारी उत्पादने इंडिपेंडन्स एफएमसीजी ब्रँड अंतर्गत सादर केली जातील, अशी ईशा अंबानी यांची योजना आहे.

Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार