नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार म्हणायचं तर या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली. दोन्ही राज्यांमध्ये बाजी मारत भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची भरपाई केली. तर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने सुद्धा सत्तेतील यशाचे एक वर्ष पूर्ण केलं. आजपासून सुरू झालेल्या वर्षात गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात राजकारण गाजणार आहे. कारण २०२५ मध्ये देशातील ५ प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.


पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांत २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय विविध राज्यांमधील राज्यसभेच्या ७५ जागांवर एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणं उदयाला येणार नाहीत तर राजकीय दशा आणि दिशाही बदलेल, असा दावा केला जात आहे.


पश्चिम बंगालमधील विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत असून एप्रिल-मे दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा असून, तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी लढत महत्त्वाची आहे. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. २०११ पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला यावेळी मागे सारण्यात आणि राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.


२०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील दुसरे प्रमुख राज्य आहे तामिळनाडू. तामिनाडूमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची कसोटी लागणार आहे. स्टॅलिनसमोर यावेळी डीएमके आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय याचा टीव्हीके पक्ष असे दुहेरी आव्हान असण्याची शक्यता आहे. २०२१ साली झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत एकूण २३४ जागांपैकी डीएमकेने १३३ जागा जिंकल्या होत्या. तर डीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.


सध्या देशात डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेलं एकमेव राज्य असलेल्या केरळमध्येही एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणुका होणार आहेत. २०२१ साली झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत एलडीएफने ९९ जागा जिंकत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती. मात्र तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत विजय मिळवल्यानंतर भाजपसुद्धा सक्रिय झाली आहे.


पूर्वोत्तर भारतातील आसाममधील विधानसभेचा कार्यकाळही संपत आला आहे. त्यामुळे येथेही एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असून, २०१६ पासून येथे भाजपाने आपले वर्चस्व राखले आहे. तसेच हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी ७५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या आघाडीला ५० जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळीही भाजप बाजी मारेल अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि