नागपूर : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात काल जोरदार राडा झाला. यानंतर आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला डिवचले आहे. ‘जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा’, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
‘ते कार्यालय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेंचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला, त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…