कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला.


आरोपींच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्यास विरोध दर्शवण्यात आला. तसेच, तीन दिवसांच्या कोठडीत कोणतीही नवी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आलेली नाही. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखं काहीही नाही, जे होतं ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, असा दावा कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.


तिनही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. न्यायधीश एस. एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली.


कोचर दाम्पत्याला सीबीआयनं दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (२४) सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी २८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्यानं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिलं होतं. सुट्टीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली. त्यावेळी हायकोर्टानं कोचर दाम्पत्याला तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज कोठडी संपत असल्यानं तिनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आज तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे