कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला.


आरोपींच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्यास विरोध दर्शवण्यात आला. तसेच, तीन दिवसांच्या कोठडीत कोणतीही नवी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आलेली नाही. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखं काहीही नाही, जे होतं ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, असा दावा कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.


तिनही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. न्यायधीश एस. एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली.


कोचर दाम्पत्याला सीबीआयनं दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (२४) सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी २८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्यानं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिलं होतं. सुट्टीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली. त्यावेळी हायकोर्टानं कोचर दाम्पत्याला तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज कोठडी संपत असल्यानं तिनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आज तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर!

मोदी, शहा, राजनाथ यांच्यासह ४० नेत्यांची यादी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

पटेल मंत्रिमंडळात तीन वर्षांनंतर मोठे फेरबदल; उद्या शहा-नड्डांच्या उपस्थितीत नवीन मंत्र्यांचा

पंतप्रधान मोदींनी आंध्रतील मंदिरात केली पूजा

नांद्याल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नांद्याल जिल्ह्यातील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)