मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.


विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्याकांड प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. अखेर २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. सुभाषसिंग ठाकूर याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.


सुभाष सिंह ठाकूर दाऊद टोळीशी संबंधित गुंड आहे.दाऊदचा मेव्हणा इस्माइल इब्राहिम पारकर याची हत्या झाली. यानंतर दाऊदच्या सूचनांचे पालन करत सुभाष सिंह ठाकूरने इस्माइल इब्राहिम पारकरच्या हत्येशी संबंधित आरोपींना एक एक करुन ठार केले होते. यानंतर सुभाष सिंह ठाकूरचे महत्त्व एकदम वाढले. पण मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर सुभाष आणि दाऊद यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला, असे सांगतात. मुंबई जवळच्या शहरांमध्ये सक्रीय असलेल्या बिल्डरांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे उद्योग करुन ९० च्या दशकात सुभाष सिंह ठाकूरने स्वतःची दहशत निर्माण केली होती. दाऊदच्या संपर्कात आल्यामुळे तर त्याचे महत्त्व आणखी वाढले होते. पुढे अटक झाल्यानंतर तुरुंगात राहून सुभाष त्याचे साम्राज्य लिलया सांभाळत होता. पण मिरा भाईंदर वसई-विरार पोलिसांनी अटक केल्यामुळे सुभाष विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या