राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार

Share

औरंगाबाद : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्यावधी निवडणूक लागण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यामध्ये नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले.

दरम्यान, रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले की, राज्यातील आताची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा दानवे यांनी यावेळी केला. रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

46 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago