सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!


नागपूर : सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव आज अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला. कर्नाटक सीमेवर असणाऱ्या ८६५ गावांना महाराष्ट्रात आणण्याचा निधार आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.


ज्यांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले त्यांना हुतात्मा म्हणून घोषित केले आहे. सध्या १३ लाभार्थी लाभ घेत आहेत. बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी लोकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे. या नागरिकांना फक्त १५ वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला द्यायचा आहे. तसेच शिक्षणासाठीही त्यांना सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमेवरील नागरिकांचे आभार मानले. बलिदान देणाऱ्या नागरिकांना हुतात्मा म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन तसेच वार्षिक प्रवास भत्ता ५०० रुपये आणि ५ हजार रुपये तत्कालीक होती ती आपण आता २० हजार रुपये करण्यात आली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी