आता 'लोकसंख्या नियंत्रण' विधेयक चर्चेत

  116

नवी दिल्ली : समान नागरी संहिता कायद्याबाबत (सीसीसी) राज्यसभेत एका खासगी सदस्य विधेयकाद्वारे `चाचपणी` केल्यानंतर आठवडाभरात भाजपच्या वतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणारे तसेच खासगी सदस्य विधेयक आणण्यात आले आहे. भाजप खासदार हरनाथसिंह यादव यांनी हे विधेयक आणले आहे.


समान नागरी संहिता विधेयक आले तेव्हा राज्यसभेत मागच्या शुक्रवारी खूप मोठा गदारोळ झाला होता. संघ परिवाराचा छुपा अजेंडा राज्यसभेच्या मार्फत आणला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र विरोधाला न जुमानता सरकारने हे विधेयक राज्यसभेत सादर करवूनच घेतले व ते संसदेच्या पटलावर कायम अस्तित्वात राहील याची तजवीज करून ठेवली.


त्यापाठोपाठ आज लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे विधेयक भाजपने थेट तशाच पध्दतीने राज्यसभेत मांडले आहे. यादव यांनी आपल्या विधेयकात, लोकसंख्येच्या वाढीमुळे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे सांगताना लोकसंख्या वाढ हीच देशाच्या आर्थिक विकासाला मारक ठरल्याचा सूर व्यक्त केला आहे. अद्याप हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलेले नाही.


यादव यांच्या विधेयकात म्हटले आहे की, लोकसंख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे गेल्या काही दशकांपासून एक भयानक स्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध संसाधने आणि सर्वांगीण विकास यांच्यातील असमतोल दूर करून आवश्यक संसाधने प्रदान करण्यात कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही. ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे त्याच गतीने सेवा प्रदान केल्या जात नाहीत.


स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी पण देशात सर्वांना पिण्यायोग्य पुरवण्यात आपण यशस्वी झालो नाही. पाणी, आरोग्य सुविधा, अन्न, घर, रोजगाराची साधने, वीजपुरवठा या साऱ्या गरजा भागविण्यात वेगाने वाढणारी लोकसंख्या हाच मुख्य अडथळा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. सरकारने एक कठोर आणि एकसमान लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, अशी मागणीही यादव यांनी केली आहे.

Comments
Add Comment

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण