नवी दिल्ली : समान नागरी संहिता कायद्याबाबत (सीसीसी) राज्यसभेत एका खासगी सदस्य विधेयकाद्वारे `चाचपणी` केल्यानंतर आठवडाभरात भाजपच्या वतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणारे तसेच खासगी सदस्य विधेयक आणण्यात आले आहे. भाजप खासदार हरनाथसिंह यादव यांनी हे विधेयक आणले आहे.
समान नागरी संहिता विधेयक आले तेव्हा राज्यसभेत मागच्या शुक्रवारी खूप मोठा गदारोळ झाला होता. संघ परिवाराचा छुपा अजेंडा राज्यसभेच्या मार्फत आणला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र विरोधाला न जुमानता सरकारने हे विधेयक राज्यसभेत सादर करवूनच घेतले व ते संसदेच्या पटलावर कायम अस्तित्वात राहील याची तजवीज करून ठेवली.
त्यापाठोपाठ आज लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे विधेयक भाजपने थेट तशाच पध्दतीने राज्यसभेत मांडले आहे. यादव यांनी आपल्या विधेयकात, लोकसंख्येच्या वाढीमुळे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे सांगताना लोकसंख्या वाढ हीच देशाच्या आर्थिक विकासाला मारक ठरल्याचा सूर व्यक्त केला आहे. अद्याप हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलेले नाही.
यादव यांच्या विधेयकात म्हटले आहे की, लोकसंख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे गेल्या काही दशकांपासून एक भयानक स्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध संसाधने आणि सर्वांगीण विकास यांच्यातील असमतोल दूर करून आवश्यक संसाधने प्रदान करण्यात कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही. ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे त्याच गतीने सेवा प्रदान केल्या जात नाहीत.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी पण देशात सर्वांना पिण्यायोग्य पुरवण्यात आपण यशस्वी झालो नाही. पाणी, आरोग्य सुविधा, अन्न, घर, रोजगाराची साधने, वीजपुरवठा या साऱ्या गरजा भागविण्यात वेगाने वाढणारी लोकसंख्या हाच मुख्य अडथळा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. सरकारने एक कठोर आणि एकसमान लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, अशी मागणीही यादव यांनी केली आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…