India China Clash : संरक्षणमंत्र्यांचे लोकसभेत निवेदन : म्हणाले, दोन्हीकडचे सैनिक जखमी; आपल्या जवानांनी चिनी सैनिकांना हुसकावले

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत (India China Clash) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ म्हणाले, ९ डिसेंबर २०२२ रोजी पीएलएच्या जवानांनी तवांगमध्ये एलएसीचे उल्लंघन करून नियम तोडले. भारतीय लष्कराने पीएलएला अतिक्रमण करण्यापासून रोखले. त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले. या घटनेत दोन्ही बाजूचे काही सैनिकही जखमी झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.


आपला एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. सैन्याने वेळीच हस्तक्षेप केला. यामुळे चिनी सैनिक माघारी गेले. यानंतर, स्थानिक कमांडरने ११ डिसेंबर रोजी चीनच्या काउंटर पार्टसोबत व्यवस्थेनुसार ध्वज बैठक घेतली. चीनला अशा कारवाईस मनाई करण्यात आली आणि शांतता राखण्यास सांगितले आहे.


अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत विरोधक पंतप्रधानांच्या उत्तराच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे राज्यसभेत विरोधकांच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तवांग संघर्षाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. तवांगमध्ये चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचे ते म्हणाले. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

Comments
Add Comment

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या