Jellyfish Crisis : कोकणातील समुद्रात विषारी जेलीफिशचे संकट

Share

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणातील समुद्रात विषारी जेलीफिशचे संकट (Jellyfish Crisis) दिसून येत असल्यामुळे येथील मच्छीमारांची चिंता वाढली आहे. हे जेलीफीश समुद्रातील मासेमारीसाठी घातक ठरत आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश आढळून येत असल्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. समुद्रात मासेमारीला घातक जेलीफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे माशांच्या उत्पादन देखील घट झाली आहे.

कोकणात पारंपरिक मच्छीव्यवसायाबरोबरच खोल समुद्रात जाऊन मच्छी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार व्यावसायिकांसमोर हे अनोखे संकट काही नवे नाही; परंतु आता उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपाय काय याचा विचार मच्छीमार व्यावसायिक करताना दिसून येत आहे.

मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात. मात्र, त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.

पर्यटन आणि मासेमारीवर अवलंबून असणाऱ्यांना मासेमारी व्यवसाय जेलीफिशमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी टाकलेली जाळीत विषारी जेलीफिशने भरून निघते. ही जेलीफिश जाळीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हाताला खाज सुटते. विषारी जेलीफिश आणि मत्स्य उत्पादनात होणारी तूट यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे.

जेलीफिश सारखी नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आल्याची परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्लेमधील वायंगणी समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले असता मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळयात अडकत असल्याने हैराण झाले आहेत. आधीच हवामान बदलाचा परिणाम मासेमारी होत असल्याने माशांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला मच्छीमार या जेलीफिशमुळे आणखी अडचणीत येऊ लागला आहे.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

21 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

51 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago