Nawab Malik : जमीन हडपण्याच्या कटात नवाब मलिकांचा सहभाग

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यातील मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरिअम गोवावाला यांची जमीन हडप करण्याबाबत हसीना पारकर, सलीम पटेल व आरोपी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कट केला होता, असे दाखवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या जामीन निर्णयात नोंदवले आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असणारे माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने ३० नोव्हेंबरला फेटाळला आहे. या निर्णयाचे पत्रक मंगळवारी उपलब्ध झाले. न्यायालयीन कोठडीत असलेले मलिक हे सध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत.


दाऊदच्या 'डी गँग' मधील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी एकमत करून गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली आहे अशा आरोपाखाली ईडीने मलिक यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली आहे.


'ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अन्वये साक्षीदारांचे जबाब व तपासाच्या दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सर्व आजही मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. ही मालमत्ता घेण्याबाबत सलीम पटेल याच्यांसोबत अर्जदाराचे व्यवहार व एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ईडीकडून पीएमएलए कायद्यातील तरतुदी लावणे उचित आहे', असे निरीक्षणही न्या. रोकडे यांनी आपल्या ४३ पानी निकालामध्ये नोंदवले आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा