Fraud : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयाचे समन्स

बेगुसराय : बिहारमध्ये योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात फसवणूक (Fraud) प्रकरणी समन्स जारी करण्यात आले असून १२ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी निंगा गावातील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कलम ४२० आणि ४१७ अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले.


शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र शर्मा यांनी योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर आरोप केलाय की, आम्ही उपचारासाठी पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड, महर्षी कॉटेज योग, ग्राम झुलामध्ये एकूण ९०,००० रुपये जमा केले होते. माझा मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे जमा केल्यानंतर मी, माझा मुलगा आणि पत्नी पतंजलीनं दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेत उपचार करण्यासाठी तिथं गेलो. परंतु, तिथं आम्हाला तुमचे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर न्यायालयानं योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात पुराव्याची दखल घेत दोन्ही आरोपींना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने