Fraud : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयाचे समन्स

  106

बेगुसराय : बिहारमध्ये योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात फसवणूक (Fraud) प्रकरणी समन्स जारी करण्यात आले असून १२ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी निंगा गावातील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कलम ४२० आणि ४१७ अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले.


शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र शर्मा यांनी योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर आरोप केलाय की, आम्ही उपचारासाठी पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड, महर्षी कॉटेज योग, ग्राम झुलामध्ये एकूण ९०,००० रुपये जमा केले होते. माझा मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे जमा केल्यानंतर मी, माझा मुलगा आणि पत्नी पतंजलीनं दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेत उपचार करण्यासाठी तिथं गेलो. परंतु, तिथं आम्हाला तुमचे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर न्यायालयानं योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात पुराव्याची दखल घेत दोन्ही आरोपींना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Comments
Add Comment

Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी

'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली'

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व

भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन