Konkan : प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही

  45

कोकणवासीयांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिला शब्द


मुंबई : “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात (Konkan) आणणार नाही” असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासीयांना दिला आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.


यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी प्रकल्पासंदर्भात बोलताना प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.


कोकणाने काही लोकांना भरभरून दिले मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे कोकणाच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचे धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही फडणवीस म्हणाले.


तसेच, रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे. त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Comments
Add Comment

Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर

मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने केला घात, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू

मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९

Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले