Konkan : प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही

कोकणवासीयांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिला शब्द


मुंबई : “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात (Konkan) आणणार नाही” असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासीयांना दिला आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.


यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी प्रकल्पासंदर्भात बोलताना प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.


कोकणाने काही लोकांना भरभरून दिले मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे कोकणाच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचे धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही फडणवीस म्हणाले.


तसेच, रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे. त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील