Sushma Andhare : सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची विखारी टीका


औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना (Sushma Andhare) बोलायला ठेवले आहे की भुंकायला. त्यांच्या मेंदूला नारू झालाय का, अशा विखारी शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली.


या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. त्यांना बोलायला ठेवले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.


सुषमा अंधारेंनी एका सभेत बोलताना मुंबईत शिवसेनेची सत्ता असताना मातोश्रीवर एक मजलाही चढला नाही. मात्र, दुसरीकडे कृष्णकुंजवर अर्पाटमेंट झाले असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले होते. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


महाजन यांनी राज ठाकरेंवर अंधारेंनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. आपल्या मालकाला विचारून त्यांनी बोलले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.


राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावे, त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते असे म्हणत प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही जातीच्या लोकांनाच पुढे केले जाते, हे उघड आहे, त्यात हातच्या कंकणाला विरोध कशाला, असा सवालच महाजन यांनी केला आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य