Sushma Andhare : सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला

  393

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची विखारी टीका


औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना (Sushma Andhare) बोलायला ठेवले आहे की भुंकायला. त्यांच्या मेंदूला नारू झालाय का, अशा विखारी शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली.


या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. त्यांना बोलायला ठेवले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.


सुषमा अंधारेंनी एका सभेत बोलताना मुंबईत शिवसेनेची सत्ता असताना मातोश्रीवर एक मजलाही चढला नाही. मात्र, दुसरीकडे कृष्णकुंजवर अर्पाटमेंट झाले असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले होते. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


महाजन यांनी राज ठाकरेंवर अंधारेंनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. आपल्या मालकाला विचारून त्यांनी बोलले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.


राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावे, त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते असे म्हणत प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही जातीच्या लोकांनाच पुढे केले जाते, हे उघड आहे, त्यात हातच्या कंकणाला विरोध कशाला, असा सवालच महाजन यांनी केला आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री