मुंबई : कोरोनाचे आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक (Measles outbreak) होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
प्रामुख्यानं लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ७१७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३०३ प्रकरणं मुंबईत आढळून आली आहेत. आतापर्यंत या आजारानं महानगरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.
गोवर हा एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. हा आजार सहसा फक्त मुलांमध्ये होतो. त्यामुळं २८ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई स्थानिक संस्थेच्या बुलेटिननुसार, मंगळवारी मुंबईत गोवरच्या पाच नवीन रुग्णांची नोंद झालीय. संशयित आजारानं एकाचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.
या वर्षी जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ७० आणि मुंबईजवळील भिवंडीमध्ये ४८ रुग्ण आढळले आहेत. या वर्षात आतापर्यंत मुंबईत गोवरच्या प्रादुर्भावाचे ७४ रुग्ण आढळले आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…