stray dogs : वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

विरार (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या वाढली असून नागरिकांसाठी धोकादायक बनत आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत १५ हजार ७४७ जणांना श्वानदंश झाल्याची बाब समोर आली आहे.


वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस श्वानांची संख्या वाढत असून मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान हीच आकडेवारी १८ हजारांच्या घरात होती. श्वानदंशाच्या या घटनांमुळे नागरिकांनी पालिकेकडे भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. श्वान दंशाबरोबरच कुत्र्यांच्या दहशतीमुळे अपघातांच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत.


वसई-विरार शहरात टोळक्याने कुत्री हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाक्यावर उभे असल्याने ते कधी हल्ला करतील याचा भरोसा नसल्याने या टोळक्या समोरून जाताना नागरिकांना भीती वाटत आहे. आजच्या घडीला शहरात जवळपास ८० हजाराहून अधिक भटक्या श्वानांची संख्या आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई गाव तसेच वसईच्या पश्चिमपट्ट्यात भटके श्वान वाढले आहेत.


दुचाकी वाहन चालकांच्या मागे हे श्वान लागत असल्याने अपघातही घडत आहेत. पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात श्वानदंशाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. चालू वर्षात जानेवारी ते आतापर्यंत १५ हजार ७४७ श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घडल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना, आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक