stray dogs : वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

विरार (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या वाढली असून नागरिकांसाठी धोकादायक बनत आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत १५ हजार ७४७ जणांना श्वानदंश झाल्याची बाब समोर आली आहे.


वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस श्वानांची संख्या वाढत असून मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान हीच आकडेवारी १८ हजारांच्या घरात होती. श्वानदंशाच्या या घटनांमुळे नागरिकांनी पालिकेकडे भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. श्वान दंशाबरोबरच कुत्र्यांच्या दहशतीमुळे अपघातांच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत.


वसई-विरार शहरात टोळक्याने कुत्री हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाक्यावर उभे असल्याने ते कधी हल्ला करतील याचा भरोसा नसल्याने या टोळक्या समोरून जाताना नागरिकांना भीती वाटत आहे. आजच्या घडीला शहरात जवळपास ८० हजाराहून अधिक भटक्या श्वानांची संख्या आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई गाव तसेच वसईच्या पश्चिमपट्ट्यात भटके श्वान वाढले आहेत.


दुचाकी वाहन चालकांच्या मागे हे श्वान लागत असल्याने अपघातही घडत आहेत. पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात श्वानदंशाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. चालू वर्षात जानेवारी ते आतापर्यंत १५ हजार ७४७ श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घडल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

मंत्र्यांचे आदेश न जुमानणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या