Bhagatsingh Koshyari : मुंबई हल्ल्यातील शहिदांना भगतसिंह कोश्यारी यांचे चप्पल घालून अभिवादन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाही. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडले. त्यांनी चक्क मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.


राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उपस्थित होते.


मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याची जखम अजूनही भळभळतेय. या हल्ल्यात अनेक पोलिसांनी जीवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवले. करकरे, कामटे, साळस्कर यांच्यासारखे पोलिस अधिकारी लढता-लढता शहीद झाले. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्या काळ्याकुट्ट दिवसाची आठवणही काढली तरी उर भरून येतो. या शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.


अभिवादन कार्यक्रमात पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व 'बिगुलर लास्ट पोस्ट' वाजविले. सर्व मान्यवर, गणवेशातील अधिकारी व पोलिस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. राज्यपालांनी उपस्थित हुतात्मा पोलिस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. मात्र, आज अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. कोश्यारी काही दिवसांपासून सतत वादात आहेत. यापूर्वी त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये वादाच्या भोवऱ्यात सापडली. विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण प्रचंड तापले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल !

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८

मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात

मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या एस ब्यु टी क्लस्टर १

आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मृतांचे आधार क्रमांक केले निष्क्रीय

मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही

मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या