Water supply : मंगळवार, बुधवारी घाटकोपर, पवईत पाणी पुरवठा बंद

Share

मुंबई (प्रतिनिधी) : जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या मंगळवार आणि बुधवारी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा (Water supply) बंद राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एल विभागात घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथील अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर (सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) येथे दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील.

एस विभागात पवई उच्चस्तर जलाशय येथील गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई (२४ तास – पाणीपुरवठा) येथे दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील.

मुंबई पालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X१८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

Shirdi Saibaba trust : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला १७५ कोटींचा आयकर माफ

या दरम्यान मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के/पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित (बंद) राहील. के/पूर्व, जी/उत्तर, पी/दक्षिण विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तर एच/पश्चिम विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

37 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

55 minutes ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

1 hour ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago