लंडन (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (student) सर्वाधिक भारतीय आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२१ ते जून २०२२ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती मिळाली आहे. इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. या काळात युरोपबाहेरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांचे प्रवक्ते यांनी या आकडेवारीवर एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहेत.
स्थलांतरितांच्या संख्येत विक्रमी वाढ होण्यामागे कोविड नियमांमध्ये दिलेली शिथिलता असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत ब्रिटनमध्ये परदेशातून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या ही भारतातील असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. यापूर्वी चीनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसामध्ये २७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केवळ विद्यार्थीच नाही, तर कुशल कामगारांच्या श्रेणीतही भारतीयांना यूकेमधून सर्वाधिक व्हिसा मिळतात. एका वर्षात भारतातील ५६,०४२ कुशल कामगारांना ब्रिटनचा व्हिसा मिळाला. त्याच वेळी, हेल्थ एंड केअर क्षेत्रातही भारतीयांना व्हिसा मिळाला होता. या श्रेणीत जारी करण्यात आलेल्या एकूण व्हिसांपैकी ३६ टक्के भारतीयांचा वाटा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने असेही निदर्शनास आणून दिले की, एका वर्षात आलेल्या स्थलांतरितांमध्ये लहान बोटीतून समुद्रमार्गे आलेल्या लोकांचा समावेश नाही. याआधी २०१५ मध्ये ब्रिटनमध्ये सर्वाधिक ३,३०,००० स्थलांतरित आल्याची नोंद होती.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीत हे देखील दिसून आले आहे की, वर्षभरात यूके सोडणारे जास्तीत जास्त लोक युरोपियन युनियनचे होते. तर गेल्या वर्षभरात यूकेमध्ये स्थलांतरित झालेल्यांमध्ये अफगाण, हाँगकाँगचे लोक देखील आहेत. युद्ध आणि चीनच्या छळामुळे ज्यांनी आपला देश सोडला आहे. या देशांतून सुमारे १, ३८,००० लोक ब्रिटनमध्ये आले.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…