Mumbai Police : पंतप्रधानांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कट; मुंबई पोलिसांना मॅसेज आल्याने खळबळ

  122

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचल्याचा व्हॉटसअप मॅसेज मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.


एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.


मुंबई पोलिसांना पाठलेल्या ऑडिओमेसेजमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कट रचला आहे. त्यासाठी त्याने मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे.


मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षी ऑगस्ट महिन्यातही ठार मारण्याची धमकी आली होती. तसा मेल 'एनआयए'ला आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी २० स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे २० किलो आरडीएक्स आहे, असे म्हटले होते. शिवाय ई-मेल पाठवणाऱ्याने आपले दहशतवाद्यांशी संबंध आहेत. या कटाचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा मेसेज आल्याने पोलिस हादरून गेले आहेत.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात