newlyweds : नवविवाहितांना त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील नवविवाहितेला (newlyweds) लग्नानंतर सासरच्या लोकांकडून आर्थिक, मानसिक, शारीरिक, शाब्दिक अशा प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध ४९८ (अ) मार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


आयुक्तलायाच्या हद्दीमधील १६ पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हेगारांना शिक्षा देखील झाल्याची माहिती आतुक्तालयामार्फत देण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार / कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देणे, त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरता पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते भरोसा सेलचे उद्घाटन करण्यात आले होते.


आयुक्तालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या मदतीने जवळपास ६३ टक्के संसार तुटण्यापासून वाचवत पुन्हा नव्याने मार्गी लावले आहेत. नवविवाहितेचा छळ, अत्याचार, मारहाण,अभद्र भाषा वापरणे, अश्लील वक्तव्य करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यांची दखल घेत महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये